Posts

Showing posts from April, 2025

लिलाबाई चव्हाण यांचे निधन

Image
लिलाबाई चव्हाण यांचे निधन  कराड ः कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे चोपदार वैकुंठवासी ह.भ.प. मुगुटराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती लिलाबाई मुगुटराव चव्हाण (वय ७०) यांचे आज आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, दीर, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक कार्यात सहभाग होता. मनमिळाऊ स्वभावामुळे त्या चव्हाण मावशी म्हणून परिचित होत्या. त्यांनी अनेक पंढरपुर वारी पायी चालत केल्या होत्या. सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव संभाजी चव्हाण यांच्या त्या वहिनी, वीज तांत्रिक कामगार युनियन बारामती झोन सचिव राम चव्हाण आणि दैनिक सकाळचे जाहिरात सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन विधी गुरुवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजता कोपर्डे हवेली येथील स्मशानभूमीत होईल.

येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी

Image
येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा विभागाकडून मंजुरीचा आदेश कराड, ता. २७ : कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळे, येवती - म्हासोली मध्यम प्रकल्प लाभक्षेत्राच्या सिंचनांतर्गत पाणी देण्यासाठी, करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था कामाच्या आराखड्याला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या बंदिस्त पाईपलाईन योजनेचे काम सुरू होणार असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम पद्धतीने पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे.  टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ मध्ये येवती– म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे ३० वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत...

काश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील ७ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर

Image
काश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील ७ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर आ.डॉ. अतुलबाबा भोसलेंकडून तिकिटाची व्यवस्था; शनिवारी रात्री परतणार पर्यटक कराड, ता. २५ : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्यामुळे तिथेच अडकून पडलेल्या कराड व सातारा येथील ७ पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांच्या विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने, हे पर्यटक शनिवारी (ता. २६) रात्री उशिरा कराडमध्ये सुखरुप परतणार आहेत.  कराडमधील इंटेरियर डिझायनर महेश मिलिंद कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासमवेत काश्मीरला पर्यटनाला गेले होते. त्यांच्यासमवेत माधवी मिलिंद कुलकर्णी, श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर हे कराडचे रहिवाशी; तर शरद हरिभाऊ पवार व विद्या शरद पवार हे सातारचे दोघे पर्यटक होते. पहेलगाम येथे अतिरेक्यांनी जेव्हा भ्याड हल्ला केला तेव्हा हे पर्यटक गुलमर्गमध्ये होते. त्यानंतर ते तातडीने श्रीनगरमध्ये निवासाच्या ठिकाणी पोहच...

श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Image
*श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी *   *कराड* : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 ते 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत, तसेच झालेल्या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकले असल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री कुलकर्णी यांनी पृथ्वीराज बाबांना दिली.  यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली, तुम्हाला मदत नक्की मिळेल तुम्ही लवकरात लवकर कराड ला पोहचाल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन पृथ्वीराज बाबांनी दिले. श्री कुलकर्णी यांच्या सोबत बोलण झाल्यानंतर  पृथ्वीराज बाबांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी सं...

रेठरे खुर्द गावकऱ्यांनी केलेला माझा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी

Image
रेठरे खुर्द गावकऱ्यांनी केलेला माझा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे अनेक नेते मंडळींनी असलंम  मुल्ला यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज रेठरे खुर्द येथील राजेंद्र मोहिते सर व्हाईस चेअरमन मराठा सोसायटी रेठरे खुर्द तानाजी मोहिते संचालक मराठा सोसायटी रेठरे खुर्द बजरंग साळुंखे तज्ञ संचालक श्री महेश पाटील तज्ञ संचालक केदारलिंग सोसायटी रेठरे खुर्द अक्षय गोरे या मान्यवरांनी आज माझ्या घरी येऊन माझ्या निवडीबद्दल मला शुभेच्छा दिल्या व माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत माझ्या खांद्यावरती आशीर्वादाची शाल देत माझा सन्मान केला या सन्मानाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे

कापिल गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील व मित्रमंडळींनी जपली सामाजिक बांधिलकी कराड वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांचा केला सन्मान

Image
महाराष्ट्र राज्य पत्रकार  संघ मुबई डिजीटल मीडिया सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. अस्लम मुल्ला (यशस्वी पत्रकार) यांचा सत्कार करताना कापिल  गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील, कापिल वि.का.स सेवा सोसायटीचे मा.चेअरमन प्रदीप डाईगडे , पैलवान शुभम जाधव, डीसीबी बँकेचे उपशाखा अधिकारी  रामचंद्र जाधव , यशस्वी पत्रकार श्री .अमोल डाईगडे व इतर कराड परिसरातील लोक उपस्थित होते.

विशेष लेखवेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी! कराड वार्ता न्युज

Image
विशेष लेख वेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी! कराड वार्ता न्युज जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५’ अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे होणारी ही भव्य समिट, भारताला जागतिक पातळीवर ‘कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. WAVES 2025 ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे. WAVES 2025: का आहे ही परिषद खास? भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment – M&E) उद्योग हा वेगाने प्...

*दिल्ली येथे भाजप सरकार विरोधात काँग्रेस ओबीसी विभागाचे निषेध आंदोलन*

Image
*दिल्ली येथे भाजप सरकार विरोधात काँग्रेस ओबीसी विभागाचे निषेध आंदोलन* **************************  *नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मोदी शासनाने द्वेषपूर्ण व सुडबुद्धीच्या भावनेने कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला घातक आहे.सत्तेची मस्ती चढलेली भाजपा ईडीच्या माध्यमातून खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्यावर निराधार गुन्हे टाकून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाने लढा  सुरू केला असून दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिलकुमार जयहिंद ( यादव ) यांच्या नेतृत्वात काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.मोदी सरकारने सुडबुद्धीचे राजकारण थांबवावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितले या वेळी भानुदास माळी यांच्यासह शेकडो काँग्रेस ओबीसी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.*

कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला

Image
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला रिशांक निलेश पाटील हा कराडच्या श्रीमती रुक्मिणी रामबिलास लाहोटी इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पहिलीतील इंग्लिश मिडीयम मधील विद्यार्थी आहे कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला  रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सौ. नीलिमा निलेश पाटील व श्री. निलेश बाजीराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते

कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला

Image
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला रिशांक निलेश पाटील हा कराडच्या श्रीमती रुक्मिणी रामविलास लाहोटी इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पहिलीतील इंग्लिश मिडीयम मधील विद्यार्थी आहे कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला  रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सौ. नीलिमा निलेश पाटील व श्री. निलेश बाजीराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते

कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला

Image
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला  कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला  रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सौ. नीलिमा निलेश पाटील व श्री. निलेश बाजीराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते

कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला

Image
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला  कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला  रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सो नीलिमा निलेश पाटील व निलेश बाबुराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या देशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते

*जिल्हा टंचाई आढावा बैठकीत आ.डॉ. अतुलबाबा भोसले पाणीप्रश्नांवर आक्रमक*

Image
*जिल्हा टंचाई आढावा बैठकीत आ.डॉ. अतुलबाबा भोसले पाणीप्रश्नांवर आक्रमक* *उंडाळे पाणीपुरवठा योजनेसाठी ७० लाखांच्या निधीची मागणी; पालकमंत्र्यांची तात्काळ मंजुरी* कराड, ता. ५ : सातारा जिल्ह्यातील टंचाई प्रश्नांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडली. या बैठकीत कराड दक्षिणमधील पाणी टंचाई प्रश्नांबाबत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत, या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे आणि जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. उंडाळे पाणीपुरवठा योजनेसाठी ७० लाखांच्या निधीची मागणी आक्रमकपणे आ.डॉ. भोसले यांनी या बैठकीत मांडली. या मागणीची पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी गांभीर्याने दखल घेत, हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. याप्रसंगी फलटणचे आ. सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील टंचाई प्रश्न...

महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माझी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या*

Image
*महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माझी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या* मौजे मरळी गावची ग्रामदेवता *श्री निनाईदेवीच्या यात्रेस* आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब सहकुटुंब पालखी सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते श्री निनाईदेवीची पूजा व आरतीही संपन्न झाली.  *यासमयी देसाई कुटुंबीय, तसेच मरळीचे ग्रामस्थ व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने पुण्यात होणार गौरव

Image
कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने पुण्यात होणार गौरव विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्व व्यक्तींचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षीचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 कापील येथील अश्विनी प्रमोद पाटील यांना जाहीर झाला आहे अश्विनी प्रमोद पाटील या महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत कराड शहर अध्यक्ष आहेत त्यांनी अनेक सामाजिक विषय चांगल्या प्रकारे हाताळले असून अनेक जणांना त्यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे  हा सन्मान सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह. घोले रोड शिवाजीनगर पुणे 23 एप्रिल रोजी. दुपारी बारा ते दोन या वेळेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे अश्विनी प्रमोद पाटील यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील**- उद्योग मंत्री उदय सामंत*

Image
*सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील* *- उद्योग मंत्री उदय सामंत* *महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण* *एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार* *उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार* सातारा, दि. 4: सातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. या ठिकाणी उद्योग व औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातारला आयटी पार्क व्हावा, अशी अनेक वर्षाची मागणी असून यासाठी सुचविण्यात आलेल्या जागा अत्यंत चांगल्या आहेत. साताराला निर्यातीची परंपरा मोठी असून ती अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.  निर्यात पारितोषिक समारंभ सातारा येथे घेण्यात येईल यासाठी मासने समन्वयक म्हणून जबाबदारी घ्यावी.  उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर उद्योग विभागाचा जनता दरबार घेण्यात येईल. उद्योजकांचे प्रलंबित कामे, मागण्या, समस्या यांचा त्वरीत निपटारा करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्या आणि...

*ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली*

Image
 *ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली*   *भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत*  *- उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई, दि.4 :- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि 'भारतकुमार' म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. 'दादासाहेब फाळके', 'पद्म...

सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीतभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू

Image
सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू सातारा : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुका हद्दीत सहयाद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उक्त नमुद केलेल्या तालुका हद्दीतील शस्त्र परवानाधारकांनी रहात असलेल्या घराच्या बाहेर शस्त्र घेवून बाहेर पडण्यास तसेच वरील तालुक्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील शस्त्र परवाना धारकांनी शस्त्रासह वर नमूद तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे**कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा

Image
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे* *कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा*  *शेंडापार्कच्या ‘आयटीहब’ला कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा घेण्याच्या बदल्यात* *विद्यापीठाला देण्यासाठी शेतीयोग्य 60 ते 100 हेक्टर जागेचा शोध दहा दिवसात घ्या* *-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश* *कृषी विद्यापीठाला शेतीयोग्य, सुविधायुक्त पर्यायी जागा देण्यासाठी* *कागल, पन्हाळा राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांना प्राधान्य* *--उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय* मुंबई, दि. 1 :- कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवा...

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम*

Image
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम* *915 उद्योगांना दिला लाभ* *- जिल्हाधिकारी संतोष पाटील* सातारा दि.1: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्देश हा  राज्य शासनाची नवीन उद्योग निर्मिती व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयामार्फत बँकांमार्फत बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास संलग्न अनुदान आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला 673 उद्योगांना कर्जास संलग्न अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते.   या तुलनेत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 985 उद्योगांना या योजनेचा लाभ देऊन 136 टक्के उद्दिष्ट पुर्तीकरत सातारा जिल्ह्याने राज्या प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश ...

रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Image
रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले नांदगाव येथे रस्ते विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन नांदगाव, ता. २ : ग्रामीण भागाच्या प्रगतीत रस्ते विकास महत्वाचा असतो. रस्ते विकासासह उत्तम पायाभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. नांदगाव (ता. कराड) येथे रस्ते विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.  भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव ते संजयनगर - रेणुका माता मंदिर रोडसाठी ८० लाख आणि नांदगाव (पेठभाग) येथील मुक्तेश्वरनगर रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख असा एकूण ९० लाखांचा निधी मंजूर झाला आह. या रस्ते विकासकामाचे भूमिपूजन व उद्‌घाटन आ. डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वि. तु. सुकरे गुरुजी होते. याप्रसंगी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की नांदगाव ते संजयनगर रस्ता अनेक दिवसांपासून व्हावा अशी या भागातील ...

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५'ला**राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार**पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण*

Image
*'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५'ला* *राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार* *पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण*       मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन  यांनी या  महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेवून विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.           पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट...

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

Image
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी उभारला जाणार नवा चारपदरी पूल कराड, ता. २ : कराड येथे ब्रिटीशांनी उभारलेल्या जुन्या कोयना पुलाला तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. कराडला पुणे-बेंगलोर महामार्गाशी जोडण्याचे काम हा पूल दीर्घकाळापासून करतो. पण गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याने तो धोकादायक बनला आहे. सध्या तर हा पूल केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठीच खुला आहे. पण लवकरच हा पूल कात टाकणार आहे. कारण कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा चारपदरी पूल उभारण्यासाठी, केंद्र सरकारच्या सी.आर.आय.एफ. फंडांतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.  स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश राजवटीत सन १८७१ च्या सुमारास जुन्या कोयना पुलाची उभारणी करण्यात आली. कराड शहराला विविध बाजूंनी जोडणारा दुवा म्हणून या पुलाची ओळख आहे. कराड परिसरातील सर्वांत पहिला लोखंड...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते**महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण**महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन*

Image
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते* *महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण* *महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन* मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिका...

कराड अर्बनने विक्रमीे व्यवसायाचा ५८०० कोटींचा टप्पा ओलांडला डॉ. सुभाष एरम; बँकेची ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धी

Image
कराड अर्बनने व्यवसायाचा ५८०० कोटींचा टप्पा ओलांडला  डॉ. सुभाष एरम; बँकेची ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धी  कराड वार्ता समूह   गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये जवळपास ६५० कोटींची विक्रमी वाढ नोंदवित कराड अर्बन बँकेने मार्च २०२५ अखेर ५८३७ कोटींची व्यवसायपूर्ती केली आहे. तसेच नेट एन.पी.ए.चे प्रमाणदेखील 'शून्य' टक्के राखत यशाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.. कराड अर्बन बँकेने पार केलेला ५८०० कोटींचा टप्पा आणि बँकेची ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धी याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. एरम म्हणाले, सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेने गुढीपाडव्याच्या सुमूहूर्तावर 'सायबर सिक...