आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.
कराड वार्ता समूह आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले. हावळेवाडी (ता.पाटण) येथील अदिती मनोज हावळे हीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी तिचे व तिच्या पालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी ते बोलत होते. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, सर्व सामान्य कुटुंबातील अदितीने मिळवलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ शिक्षणचं परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. त्यातून स्वतःचे व समाजाचे परिवर्तन होऊन प्रगती होते. काळानुरुप शिक्षणाचे स्वरूप बदलत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे गरजे आहे. शिक्षणाबद्दल पालकांच्यात सुद्धा जागृती झाली असून आपल्या मुलाच्या शिक्षणाकरिता ते अपार कष्ट उपसत आहेत. आई-वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे जाणीव ठ...