कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर कराड, ता. १२ कराड वार्ता न्युज : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. कृष्णा कारखान्याच्या...
कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी बाबासाहेब कल्याणीसाहेबांच्या स्वागतासाठी बाल चिमुकल्याणसह संपूर्ण गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद कराड - कोळे गावाच्या विकास कामांसाठी लागेल तेवढी मदत मी करणार आहे. कोळे हे गाव माझे गाव असून हे गाव मला एक विशिष्ट ठिकाणी न्यायचे असून यासाठी गावकऱ्यांचे हातभार असणे गरजेचे आहे. कोळ्याचे नाव हे अभिमानाने मला घेता आले पाहिजे. कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे आहे त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.भारत फोर्सच्या सी.आर. एस. फंडाच्या माध्यमातून लागेल ती मदत, लागेल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही भारत फोर्जचे चेअरमन, पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणीसाहेब यांनी सांगितले. जगप्रसिद्ध उद्योजक फोर्जिग क्षेत्रात विशेष असे ज्या कंपनीने ठसा उमटवला व संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वदेशी रणगाडे, तोफा व इतर सामुग्री पुरवणारी कंपनी. 20 ते 25 देशात विस्तार असणारी कंपनी भारत फोर्ज चे चेअरमन पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणी यांनी त्यांच्या मूळ गावी कोळ...
माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली प्रशासनाचा माऊली पालखी तळावर गोधळ नियोजनाचा अभाव पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात वैष्णवांचा मेळा दाखल. फुलाची चादर टाकून रंग रांगोळी काढून केले माऊलीचे स्वागत दर्शन रांगेच्या बद्दला मुळे भक्ता मध्ये प्रंचड गोंदळ तुफान गर्दी पोलीस प्रशासनाचे दुलक्ष लोणंद प्रतिनिधी- अक्षय दोशी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात गुरुवारी दुपारी दिड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखी सोहळयाचे प्रवर्तक हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊली च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सा...
Comments
Post a Comment