कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज


*कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज

 *कराड:* टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे  व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल. असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत तसेच त्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही तर अशा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी सुद्धा मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. 

आ. चव्हाण यांच्या या दोन्ही मागण्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारुंजी येथील प्रस्तावित बांधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती देत ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी टेंभू योजनेत गेल्या आहेत त्यांना सुद्धा पूर्ण मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल अशी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.